Advertisements
Advertisements
Question
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
Advertisements
Solution
मी आता अकरावीत आहे. पण हा प्रसंग सांगत आहे, ता आहे मी नववीत असतानाचा. आम्ही पाच-सहा मित्र नेहमी एकमेकांच्या घरी अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. हसतखेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी आयुष्यभर विसरणार नाही.
एकदा आम्ही असेच आमच्या घरी अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करीत होती. तेवढ्यात एक बाई आल्या. आल्या त्या घरातच घुसल्या. घसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली.
"अहो, काय ऐकताय की नाही? तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटून गेलं. एक रुपया तुम्ही अजून परत केला नाही. व्याजावर व्याज चढत चाललं आहे. आणि तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? दुसऱ्याचे पैसे ठेवून तुम्हांला अन्न गोड कसं लागतं? अहो, माझ्यासारखीने तर जीव दिला असता! आम्ही उपाशी राहिलो असतो. पण दुसऱ्याचे पैसे आधी दिले असते. मगच दोन घास खाल्ले असते." त्या बाई असे काहीबाही बडबडून निघून गेल्या.
हे ऐकून मी हादरूनच गेलो. पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळना. आमची परिस्थिती गरिबीची होती, सतत कोणा ना कोणाकडून पैसे उसने घ्यावे लागत. सतत ओढाताण होई. पण आता मित्रासमार है असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना. मी टेबलावर डोके टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागल. तेवढ्यात माझा मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तव्हा। मात्र माझा बांधच फुटला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. म्हणाला, "बाळांनो, तुम्ही आता घरी जा. तुमचा अभ्यास होणार नाही.
मित्र उठले. कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले. आत गेली. माझ्या आईची समजूत काढली. सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्या घरी जमले. त्या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे कर्ज फेडायचे ठरवले होते. विवानची आई म्हणाली, "आपली ही मुलं गुणी आहेत. या सगळ्यांना आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून जगू द्या."
APPEARS IN
RELATED QUESTIONS
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
| ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
| (१) डोळे | |
| (२) कान | |
| (३) नाक | |
| (४) त्वचा |
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
