Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
नाटक ही समूहकला आहे. त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे. नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगांचे ज्ञान आवश्यक असते.
नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरांवरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे, हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्र रचना करणे व परस्परविरोधी स्वभावांतील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे, हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी खटकेबाज, तर कधी भावोत्कट संवादांची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______
कारणे लिहा.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
