Advertisements
Advertisements
Question
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
Solution
या कादंबरीच्या लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. मुळात टॉलस्टॉय हे अत्यंत चोखंदळ वृत्तीचे होते. त्यामुळे लिहिलेला भाग पुन्हा पुन्हा तपासून अधिकाधिक चांगला करण्यासाठी वार वार पुन्हा पुन्हा लिहून काढत. त्यामुळे आधी निश्चित केलेला आराखडा अनेकदा विस्कटून जात असे. त्यामुळे लेखनाला निश्चित असा, व्यवस्थित आकार येत नसे. कादंबरीची सुरुवात कशी करावी, हा त्यांच्या दृष्टीने यक्षप्रश्न होता. बारा-पंधरा वेळा वेगवेगळ्या पद्धतींनी सुरुवात करून पाहिली. प्रत्येक वेळी ती त्यांच्या पसंतीस येत नसे. चोखंदळपणामुळे वर्णने जिवंत होऊन उठत. हे खरे असले तरी पुन्हा पुन्हा लिहावे लागण्याने लिहिण्याची हमालीसुद्धा खूप वाढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या परिष्करणाला तोडच नव्हती. प्रत्येक शब्द घासून-पुसून, पुन्हा पुन्हा तपासून घेतला जात होता. प्रतिमांची रचनासुद्धा अचूक करण्याचा प्रयत्न होता. पात्रांची योजना, त्यांचे स्वभाव, त्यानुसार होणारे त्यांचे वागणे-बोलणे या सगळ्यांशी सुसंगत अशी कथानकाची रचना, अचूक ऐतिहासिक संदर्भ वगैरे सगळ्या बाबी कटाक्षाने वापरायच्या आग्रहामुळे पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढावी लागली होती.
इतके पुनर्लेखन झाल्यावर लिहिलेली सर्व पाने टॉलस्टॉय यांची पत्नी सोन्या हिच्याकडे सोपवली जात. ती रात्रभर जागून सर्व पाने सुवाच्य अक्षरांत लिहून काढी. टॉलस्टॉय सकाळी उठल्यावर ती सर्व पाने पुन्हा बारकाईने वाचून काढत. बारीक बारीक बदल केले जात. त्यांच्या खाणाखुणा केल्या जात. असे करता करता ती सर्व पाने पन्हा चिताडली जात. सोन्या ती पुन्हा लिहून काढीत असे. दोन हजार पानांची ही कादंबरी जवळजवळ सात वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली गेली. या कष्टांची कमाल झाली
APPEARS IN
RELATED QUESTIONS
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______
कारणे लिहा.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
