English

स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

या कादंबरीच्या लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. मुळात टॉलस्टॉय हे अत्यंत चोखंदळ वृत्तीचे होते. त्यामुळे लिहिलेला भाग पुन्हा पुन्हा तपासून अधिकाधिक चांगला करण्यासाठी वार वार पुन्हा पुन्हा लिहून काढत. त्यामुळे आधी निश्चित केलेला आराखडा अनेकदा विस्कटून जात असे. त्यामुळे लेखनाला निश्चित असा, व्यवस्थित आकार येत नसे. कादंबरीची सुरुवात कशी करावी, हा त्यांच्या दृष्टीने यक्षप्रश्न होता. बारा-पंधरा वेळा वेगवेगळ्या पद्धतींनी सुरुवात करून पाहिली. प्रत्येक वेळी ती त्यांच्या पसंतीस येत नसे. चोखंदळपणामुळे वर्णने जिवंत होऊन उठत. हे खरे असले तरी पुन्हा पुन्हा लिहावे लागण्याने लिहिण्याची हमालीसुद्धा खूप वाढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या परिष्करणाला तोडच नव्हती. प्रत्येक शब्द घासून-पुसून, पुन्हा पुन्हा तपासून घेतला जात होता. प्रतिमांची रचनासुद्धा अचूक करण्याचा प्रयत्न होता. पात्रांची योजना, त्यांचे स्वभाव, त्यानुसार होणारे त्यांचे वागणे-बोलणे या सगळ्यांशी सुसंगत अशी कथानकाची रचना, अचूक ऐतिहासिक संदर्भ वगैरे सगळ्या बाबी कटाक्षाने वापरायच्या आग्रहामुळे पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढावी लागली होती.
इतके पुनर्लेखन झाल्यावर लिहिलेली सर्व पाने टॉलस्टॉय यांची पत्नी सोन्या हिच्याकडे सोपवली जात. ती रात्रभर जागून सर्व पाने सुवाच्य अक्षरांत लिहून काढी. टॉलस्टॉय सकाळी उठल्यावर ती सर्व पाने पुन्हा बारकाईने वाचून काढत. बारीक बारीक बदल केले जात. त्यांच्या खाणाखुणा केल्या जात. असे करता करता ती सर्व पाने पन्हा चिताडली जात. सोन्या ती पुन्हा लिहून काढीत असे. दोन हजार पानांची ही कादंबरी जवळजवळ सात वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली गेली. या कष्टांची कमाल झाली

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
कृती | Q (४) (इ) | Page 52

RELATED QUESTIONS

कारणे लिहा.

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______


कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:


नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.


'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×