Advertisements
Advertisements
Question
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
Advertisements
Solution
'परिमळ' हा पाठ वाचल्यावर अत्रे यांच्या भाषेचा एक गुण प्रथमच ठळकपणे जाणवतो. तो म्हणजे त्यांची साधी, सोपी, सरळ भाषा. भाषेत कुठे कठीणपणा, खडबडीतपणा आढळणार नाही. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठात कुठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे; भारदस्त, उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कुठेही भारदस्त बोजड शब्दांचा वापर केलेला नाही. आपले लेखन लोकांना भारदस्त वाटावे, यापेक्षा आपले लेखन लोकांना कळले पाहिजे, ही त्यांची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे त्यांची भाषा सर्वसामान्य 'वाचकांना सहज कळेल अशी आहे. हे त्यांचे फार मोठे सामर्थ्य आहे.
'अत्रे यांच्या लेखाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे; ते म्हणजे त्यांची भाषा ही लिहिल्यासारखी नाही, तर ती बोलल्यासारखी आहे. ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. वाचकांना काही तरी सांगायचे आहे, अशी त्यांची भावना असते. यामुळे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण होते. वाचकांशी संवाद साधायचा असल्याने त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. बहिणाबाईंच्या कविता त्यांना प्रचंड आवडल्या आहेत. म्हणून ते त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत आहेत.
प्र. के. अत्रे यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी सोपानदेव चौधरी यांच्याबरोबर झालेली त्यांची भेट आठवून पाहा. सोपानदेवांचा लाजाळूपणा, स्वतःच्या आईची कविता भीतभीतच वाचन दाखवणे, अत्रे यांनी कवितेची वही खसकन त्यांच्या हातातून काढून घेणे, त्यातल्या कविता अधाशीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडून सांगणे या सर्व कृती मध्ये एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो. त्यामुळे अत्रे आत्मीयतेने बोलत आहेत, असे जाणवत राहते. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण जाणले आहे. पण ते त्यांनी कसे सांगितले आहे, ते मी येथे नोंदवले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
| ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
| (१) डोळे | |
| (२) कान | |
| (३) नाक | |
| (४) त्वचा |
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
