Advertisements
Advertisements
Question
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फेकला गेला आहे. आता पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत, पैसा मिळाला की माणूस सुखी होती, पैशामध्येच सगळी पुणे दडलेली आहेत, त्यामुळे पैसा मिळवणे हेच साच्च ध्येय बनले आहे, माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही, या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे, केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यनी भावनांची जागा घेतली आहे, हे आता सर्वच क्षेत्रात दिसू लागले आहे, यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे, ओलावा नाहीसा । झाला आहे. माणसाचे खरे जीवन है या भावनेच्या ओलाव्यात असते. तेच संपले तर मग तो माणसाचा अंत ठरेल, माणूस पशुपातळीवर येईल.
याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरली आहे. जे जे उपयुक्त ते ते चांगले, सर्वश्रेष्ठ होय, हीच आता सर्वांची धारणा झाली आहे, घरातली नाती संपली, वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वृध एकमेकांना दुरावले, वृद्धांचा आधार गेला, भावनिक आधारही उरला नाही. याचा कुटुंबसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या गरजा फक्त पैशाने 'भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे, आता मुलांना आई-बाबांचा उबदार स्पर्श मिळेनासा झाला आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील, ती माणसे नसतील. ती जनावरे असतील. आणि हा माणसाचा अंत असेल, यातून सावरायचे असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा, संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे है महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
