English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.

रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 14

RELATED QUESTIONS

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.


संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


कारणे शोधा.

काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...


सहसंबंध शोधा.

सावध : बेसावध : : विश्वासू : ______


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


वाक्य पूर्ण करा.

आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.


झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×