English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.

रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 14

RELATED QUESTIONS

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

सरळमार्गी - 


संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.


तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

संगीतमय झाड -


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


चूक की बरोबर ते लिहा.

लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.


वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

हिरमुसले होणे  

‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×