Advertisements
Advertisements
Question
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
Advertisements
Solution
स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.
रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
