Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
Advertisements
Solution
- रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
- पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
- एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे.
- रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
आकृती पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
