Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
Advertisements
Solution
- रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
- पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
- एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे.
- रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) कोलाहल | (अ) प्रवासी |
| (२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
| (३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
| (४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.

संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
आकृतिबंध पूर्ण करा.

‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
