Advertisements
Advertisements
Question
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
Advertisements
Solution
प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात नेमून दिलेली कामे पार पाडत असते. या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना वेगळेपण मिळवून देतो तो म्हणजे प्रत्येकाने जोपासलेला छंद. शालेय जीवनापासूनच छंद जोपासल्यास आपली एकाग्रता वाढते. तो छंद जोपासण्याचा ध्यास निर्माण होतो. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कुतूहल वाढते. या कुतूहलातूनच नवीन गोष्टी आत्मसात करता येतात. छंद व्यक्तीला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे वाईट बाबींकडे व्यक्तींचा ओढा जात नाही. एकंदरीतच छंदामुळे व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
आकृती पूर्ण करा.

संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
