Advertisements
Advertisements
प्रश्न
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.
रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
