Advertisements
Advertisements
प्रश्न
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.
रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
आकृती पूर्ण करा.

व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
फरक स्पष्ट करा.

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
