मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

स्वातंत्र्यपूर्वकाळात रेल्वे भारतात आणली गेली. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तिकिटरूपाने रेल्वेला मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागला.

रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता ती दळणवळणातील महत्त्वाचे पाऊल ठरली. उद्योगधंद्यामधील मालाची आयात-निर्यात करण्याकरता या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मालगाडीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात वाढली. परिणामी, आर्थिकदृष्ट्या भारत अधिकाधिक प्रगत होत गेला. आज भारतातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेमुळे जोडली गेली, त्यामुळे उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यवसायाकरता खेड्यांमधून माणसांना शहरात येणे सहज, सुलभ झाले. थोडक्यात, रेल्वेचा शोध भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ६. (अ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्‍न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ

रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.


आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.


विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


कारणे शोधा.

नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.


आकृती पूर्ण करा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

हिरमुसले होणे  

‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×