English

'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

अफाटपणा, प्रचंडपणा, टॉलस्टॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण होते. त्यांनी केलेला अभ्यास पाहून कुणीही थक्क होईल. त्यांनी केलेल्या अभ्यासाला लेखिकांनी अभ्यासाचे डोंगर अशी उपमा दिली आहे. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची संख्या मुळी शेकड्यांच्या संख्येमध्ये आहे. त्यांच्या या गुणांबरोबरच चोखंदळपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा गुण आहे. जे मिळवायचे आहे, जे निर्माण करायचे आहे, ते पूर्णपणे चोख, पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमीन खूप नांगरतो. जमिनीचा-मातीचा कस वाढवतो. त्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात, कसदार आणि उत्तम दर्जाचे मिळते. टॉलस्टॉय यांनी कादंबरीची मुद्रण प्रत हीच जमीन मानली.
शेतकरी कष्ट घेतो तसे कष्ट त्यांनी लेखन करताना घेतले. शेकडो संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला. जो कालखंड कादंबरीत चित्रित करायचा होता, त्या कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये शोधून काढली. ती कादंबरी लेखनासाठी उपयोगात आणली. ऐतिहासिक संदर्भ काटेकोरपणे तपासून घेतले. घ्यायच्या सर्व तपशिलांची खातरजमा केली. त्यामुळे विशिष्ट कालखंडातील समाजजीवन कादंबरीमध्ये जिवंत होऊन उठले. ऐतिहासिक तपशिलांबद्दल जागरूक राहिल्यामुळे कादंबरीतील वर्णनांविषयी विश्वासार्हता वाढली. कादंबरी अधिक वास्तववादी झाली.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
कृती | Q (५) (आ) | Page 52

RELATED QUESTIONS

कारणे लिहा.

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल निशावहिनींचा सल्ल
   
   
   

पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकातील संवाद


स्वमत.

‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×