हिंदी

'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

अफाटपणा, प्रचंडपणा, टॉलस्टॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण होते. त्यांनी केलेला अभ्यास पाहून कुणीही थक्क होईल. त्यांनी केलेल्या अभ्यासाला लेखिकांनी अभ्यासाचे डोंगर अशी उपमा दिली आहे. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची संख्या मुळी शेकड्यांच्या संख्येमध्ये आहे. त्यांच्या या गुणांबरोबरच चोखंदळपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा गुण आहे. जे मिळवायचे आहे, जे निर्माण करायचे आहे, ते पूर्णपणे चोख, पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमीन खूप नांगरतो. जमिनीचा-मातीचा कस वाढवतो. त्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात, कसदार आणि उत्तम दर्जाचे मिळते. टॉलस्टॉय यांनी कादंबरीची मुद्रण प्रत हीच जमीन मानली.
शेतकरी कष्ट घेतो तसे कष्ट त्यांनी लेखन करताना घेतले. शेकडो संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला. जो कालखंड कादंबरीत चित्रित करायचा होता, त्या कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये शोधून काढली. ती कादंबरी लेखनासाठी उपयोगात आणली. ऐतिहासिक संदर्भ काटेकोरपणे तपासून घेतले. घ्यायच्या सर्व तपशिलांची खातरजमा केली. त्यामुळे विशिष्ट कालखंडातील समाजजीवन कादंबरीमध्ये जिवंत होऊन उठले. ऐतिहासिक तपशिलांबद्दल जागरूक राहिल्यामुळे कादंबरीतील वर्णनांविषयी विश्वासार्हता वाढली. कादंबरी अधिक वास्तववादी झाली.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार - कृती [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 2.11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
कृती | Q (५) (आ) | पृष्ठ ५२

संबंधित प्रश्न

'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.


‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल निशावहिनींचा सल्ल
   
   
   

पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.


सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने


नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा


'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×