Advertisements
Advertisements
प्रश्न
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
Advertisements
उत्तर
टॉलस्टॉय हे प्रतिभासंपन्न साहित्यिक होतेच, शिवाय ते थोर तत्त्वचिंतक आणि शिक्षण शास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी सत्य, शांती, त्याग आणि सेवा या मूल्यांची आयुष्यभर उपासना केली. या मूल्यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते, तसेच ते त्यांच्या अन्य लेखनातून ही घडते. त्यांनी आयुष्यभर जे कार्य केले, त्या कार्यातूनही या मूल्यांचेच दर्शन घडते.
प्रस्तुत पाठामध्ये टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून झालेल्या घडामोडींचे चित्रण आले आहे. त्यांना स्वतःची कलाकृती सर्वश्रेष्ठ व्हावी, ही आस होतीच. पण एवढ्यावरच त्यांचे मन थांबले नव्हते. त्यांना आपली कलाकृती आदर्श व्हावी असे वाटत होते. आदर्श होण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट उपसले. प्रचंड अभ्यास केला. त्यांच्या 'युद्ध व शांती' या कादंबरीचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. या कादंबरीत हजारो घटना आहेत. पाचशेहून अधिक व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्ती दुसरीपासून वेगळी आहे. प्रत्येकीचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. त्यासाठी बारीक-सारीक तपशिलांचा त्यांनी अभ्यास केला. वेगवेगळ्या वृत्तींच्या व्यक्तींचा अभ्यास केला आणि आपल्या कादंबरीतील व्यक्ती घडवल्या. प्रसंगांचा काटेकोर अभ्यास केला. त्यासाठी हजारो ग्रंथ अभ्यासले. कितीतरी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. शक्य तिथे ठिकाणांना भेटी दिल्या. कादंबरीतील युद्धाचे वर्णन प्रत्ययकारक व्हावे म्हणून दरम्यानच्या काळात होऊन गेलेल्या युद्धाचा त्यांनी अभ्यास केला. त्या युद्धात सामील झालेल्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. अशा प्रकारे अभ्यास करून २००० पृष्ठांची कादंबरी लिहिली. ती लिहिताना शब्दांचा काटेकोरपणाही पाळला. शेकडो परिच्छेद, पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढली.
त्यांच्या आयुष्यातील त्यांचे एक खास कार्य सांगितलेच पाहिजे. युरोपात जाऊन तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि स्वतःच्या गावी येऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडली. त्या शाळेत प्रचलित अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यांना बाजूला सारले. एक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती सुरू केली. टॉलस्टॉय यांचे मोठेपण व्यक्त करण्यासाठी ही घटना खूप महत्त्वाची आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
