Advertisements
Advertisements
प्रश्न
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
मी आता अकरावीत आहे. जेथे जातो तिथे बारावीनंतर काय करणार? इंजिनीअर व्हायचंय की डॉक्टर व्हायचंय, हे प्रश्न पुढे येतात आणि मग चर्चा सुरू होते. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की नंतर काय काय घडते, कुठे नोकरी मिळते, कितीचे पॅकेज मिळते वरगैरे मुद्द्यांपर्यंत चर्चा रंगते.
अनेकदा मलाही या चर्चेत आनंद मिळायचा. वाटायचे की, खूप खूप शिकेन. मग काय अन्वयदादासारखा इंजिनीअर होईन. मोठा पगार मिळेल! त्याच्यासारखी बाईक घेईन! विचार करता करता माझ्या। डोळ्यांसमोर आजूबाजूचे नोकरी करू लागलेले चेहरे येऊ लागले आणि मला वेगळेच जाणवू लागले.
अन्वयदादा सकाळी साडेसात वाजता घरी सोडतो आणि रात्री साडेआठ-नऊ वाजता घरी येतो. आल्यानंतर पूर्ण थकून गेलेला असतो. जेवण झाले की लॅपटॉप काढतो. तास-दीड तास ऑफिसचे काम करतो आणि झोपी जातो. हेच अभिषेकचेही चालू आहे. तो तर कधी कधी उशीर झाल्यावर ऑफिसमध्येच राहतो. विकासला नोकरी लागली, तीच बंगलोरच्या ऑफिसमध्ये. जवळजवळ सगळ्यांचीच ही गत झाली आहे. कोणालाही इतरांकडे जाण्यासाठी वेळ नाही. बोलण्यासाठी वेळ नाही. समोरासमोर दिसल्यावर एकमेकाला फक्त हाय करतात ; बाकी संवाद नाही. हे घरातही कोणाशी बोलत नाहीत. यांना कामाचा ताण असणार, त्यांना अधिक त्रास व्हायला नको, म्हणून मग घरातले लोक त्यांना प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक घरात आपापसांत फक्त शांतता आहे.
मला कधी कधी वाटते की, खूप अभ्यास करायचा, खूप शिकायचे ते यासाठीच का? जगायचे म्हणजे नेमके काय करायचे? फक्त पैसा मिळवायचा? तो कशासाठी? कारण पैसा मिळवल्यानंतरसुद्धा माझ्या आजूबाजूचे लोक दुःखी कसे दिसतात? आपण लक्षात घेतले पाहिजे की, पैसा हे फक्त साधन आहे. म्हणून ठरावीक टप्प्यानंतर पैशाची किंमत शून्य होते. आता आपला दृष्टिकोन बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
कारणे लिहा.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
