Advertisements
Advertisements
प्रश्न
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते : सर्व घरकाम स्त्रीच्या अंगावर येऊन पडते. स्वत:साठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किंमतही देत नाही. घरी केव्हाही, कधीही, कितीही पाहुणे येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल, याचे भान पाहणे बाळगत नाहीत. सासू-सुना यांच्यातील भांडणे, कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष सहकाऱ्यांकडून होणारा त्रास, महाविद्यालयात शिकायला जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास, व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या.
या समस्यांकडे पाहिल्यावर लक्षात येईल की, या सर्व समस्या स्त्रियांशी निगडित आहेत. या सर्व समस्या स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टांची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत, घरातली कामे महत्त्वाची असतातच. घरातल्या सगळ्यांनी ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे. तसे होत नाही.
सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल, असे आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागतो. छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होतो. आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे बघितले पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
| ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
| (१) डोळे | |
| (२) कान | |
| (३) नाक | |
| (४) त्वचा |
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
