हिंदी

वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघातात मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिस लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.
हलकीफुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते.
या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते. या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - कृती [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 2.09 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
कृती | Q (५) (अ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्न

कारणे लिहा.

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.


नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


वैशिष्ट्ये लिहा.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
   
   
   

फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटक अनेक कलांचा संगम


स्वमत.

‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा


‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×