मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघातात मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिस लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.
हलकीफुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते.
या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते. या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - कृती [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 2.09 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
कृती | Q (५) (अ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

कारणे लिहा.

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


वैशिष्ट्ये लिहा.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल निशावहिनींचा सल्ल
   
   
   

पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती


सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
   
   
   

खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन  

स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकातील संवाद


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटक अनेक कलांचा संगम


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा


'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×