मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांना समाजजीवनात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जन्माला आली की घरात निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे. नाही असे नाही. पण ती सुशिक्षितांच्या घरांत. अशिक्षितांच्या घरांत किंवा ग्रामीण भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळ जवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो.
स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात. त्यांच्यात शारीरिक क्षमता कमी असते. त्या मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगांत त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषांएवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची, किचकट कामे त्यांना झेपत नाहीत. वगैरे वगैरे गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागांत तर चारचौघांची बैठक चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये, असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी-भांडी व मुलांचे संगोपन एवढ्याच गोष्टी पाहाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही.
पूर्वी प्राधान्याने मुलग्यांनाच शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. दहावीपर्यंत तरी मुलींना आडकाठी केली जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढूनही शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर आपण दुबळा ठेवला, तर पूर्ण ' समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार?
स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे त्याला विरोध केला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत. त्याला कोणताही पर्याय नाही.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - कृती [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 2.09 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
कृती | Q (५) (आ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.


पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


वैशिष्ट्ये लिहा.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.


वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :


______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
   
   
   

फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

खालील कृती करा.


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.


'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×