Advertisements
Advertisements
प्रश्न
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
Advertisements
उत्तर
जागतिकीकरणाचे अनेक परिणाम घडत आहेत, त्यांतला एक परिणाम म्हणजे पराकोटीची स्पर्धा, माणसाला पैसा मिळवण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागत आहे. त्यातूनच, पैसा हेच एकमेव साध्य बनून गेले आहे. स्पर्धेमुळे मार्केटिंगचा जमाना आला, सगळ्या गोष्टी पेशाने मापल्या जाऊ लागल्या, पैशासाठी सगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. किंबहुना, पैसा मिळवणे हाच सर्व गोष्टींचा हेतू निश्चित होऊ लागला. हे सुद्धा इतके भरभर आणि धबधबा प्रमाणे इतक्या जोराने येऊन आदळले की, माणसांना विचार करायचीसुद्धा संधी मिळाली नाही.
शिक्षण हे आपल्याकडे अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जात होते. 'ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जे देते ते शिक्षण, अशी आपली समजूत होती. शिक्षणाचा हा उदात्त हेतू संपुष्टात आला. शिक्षण हेसुद्धा पैशासाठी घ्यायचे असते, पैशा च्या साहाय्याने घ्यायचे असते, ही धारणा घट्ट झाली, शिक्षणाला बाजारी रूप आले.
याचा सर्वव्यापी परिणाम घडून आला. घर, आईवडील, माणसे यांच्यामधली नातीसुद्धा उपयुक्ततेच्या पातळीवर आली. जे उपयुक्त ते आणि तेवढेच चांगले होय, हा दृष्टिकोन निर्माण झाला. घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅट आले. माणसामाणसांमधील मानवी संबंध नष्ट झाले. आईवडिलांनी स्वत:चे सर्वस्व ओतून मुलांना वाढवले. पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलांमध्ये शिल्लक राहिली नाही. स्पर्धेने त्यांना इतके करकचून आवळून टाकले की, ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलणेही अवघड झाले. यात पराकोटीची औपचारिकता आली. कृत्रिम त निर्माण झाली. माणसे यांत्रिकपणे वावरू लागली. म्हणूनच लेखक म्हणतात की, माणूस 'दिसतो' पण 'जाणवत' नाही. ओठ हलताना दिसतात, पण साद पोहोचत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
