Advertisements
Advertisements
प्रश्न
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
Advertisements
उत्तर
ही कारणे लिहिण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची, असा नियम होता. पुरुष या कामांना हात लावत नसे. पुरुषाच्या पेन, पाकीट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या आणि पुरुषांना हव्या त्या वेळी त्यांच्या हाती दयायचा. पाहणे सुद्धा केव्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराई करावी, त्या वेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू नये, असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द केले पाहिजे, असे सगळेजण मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांची सरबराई केली पाहिजे, असा दंडक होता.
या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे. स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी सांभाळते, तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखादया दिवशी पतीने स्वयंपाक करावा. पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखादया दिवशी पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले, तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये. म्हणजे हळूहळू पाहुण्यांनासुद्धा न कळवता अचानक कोणाहीकडे जाऊ नये, याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूपच बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते, पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
| उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
