Advertisements
Advertisements
Question
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
Advertisements
Solution
अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती, शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला असा आशय व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची 'शब्द' ही कविता आपल्याला शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते. विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जिवाची काहिली करत जगताना शब्दांनी नकारांशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते, हा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे.
पदोपदी जगण्याचे बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवींनी आत्मीय व भावपूर्ण शब्दांमध्ये साकारली आहे. त्यांच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना त्यांनी अनेक हृदय प्रतिमा वापरलेल्या आहेत. 'निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा,' अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून कवितेचा भावार्थ दुग्गोचर होतो.
चार-चार ओळींचा सैल यमकप्रमाध पदबंध असलेली ही कविता थट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी 'शब्द' ही कविता मला अत्यंत आवडली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा _______
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
