Advertisements
Advertisements
Question
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
Advertisements
Solution
स्त्री-पुरुष हा भेद नैसर्गिक आहे, तो मानवनिर्मित नाही, परंतु पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृती अनेक जुलमी रूढींच्या बंधनांत स्त्रीला जखडून ठेवले होते. तत्कालीन विचारवंत व समाजसुधारकांनी स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडली आणि स्त्री-शक्ती हळूहळू प्रस्थापित होऊन स्त्री-स्वातंत्र्याचा उद्घोष झाला.
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या गेल्या वीस वर्षांतील स्त्रीला आपल्यातल्या स्त्री-शक्तीची जाणीव झाली व ती समाजात स्वकर्तृत्वाने तळपू लागली आहे. भविष्यकाळात स्त्रीने झपाट्याने प्रगतिशील व्हायला हवे. स्वत:ला स्त्री न मानता 'व्यक्ती' मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने पारंगत होणे गरजेचे आहे. पुरुषी काम करण्यात धन्यता न मानता स्वत:ची स्वतंत्र क्षेत्रे प्रतिभेने निर्माण करायला हवीत. शास्त्रीय संशोधन, सैनिकी शिक्षण, अवकाश उड्डाण अशा अनेक विविध आव्हानात्मक क्षेत्रांत प्रगत व्हायला हवे. स्वत:चे संरक्षण करण्याइतपत सशक्त व्हायला हवे आणि इतर स्त्रियांसाठी 'महिला सक्षमीकरण' वैचारिक व मानसिक पातळीवर करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:चे विदयापीठ स्वत:च होणे आवश्यक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
