Advertisements
Advertisements
Question
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
'पैंजण' या कवितेत कवयित्री नीलम माणगावे यांनी चितारलेली आजी व आजच्या युगातील आधुनिक आजी यांच्या कौटुंबिक स्थानांत जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे.
कवितेत वर्णन केलेल्या आजीच्या पायात अवजड पैंजण होते, म्हणजे रूढीपरंपरेच्या भोवऱ्यात ती जखडलेली होती. त्या काळातील समाजव्यवस्था, सामाजिक मूल्ये व कौटुंबिक व्यवस्था यांनी आजीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. स्वयंपाकघर व माजघर हीच तिची हद्द होती. आणि 'चूल व मूल' हा तिचा एकांगी संसार होता. तिला बाहेरच्या अंगणातही डोकावण्याची मुभा नव्हती नि बाहेरचे जग तिला पारखे होते. म्हणून रूढींचा जुलूम निमूटपणे सोसत कवितेतली आजी जीवन जगत होती. तिच्या मनातील भावना व विचार यांच्या प्रकटीकरणाला मज्जाव होता.
आजची आजी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती घरात व घराबाहेर स्वतंत्रपणे वावरू शकते. स्त्री-शक्ती जागृत झाल्यामुळे ती स्वत:चे विचार मुक्तपणे मांडू शकते. सामाजिक कार्य करू शकते. घरातील नातवंडांपासून मोठ्यांपर्यंतचा गोतावळा समर्थपणे पेलू शकते. तिला कुठलाही अटकाव नाही. ती हवा तसा पेहराव व दागदागिने घालू शकते. कुठल्याही कौटुंबिक व सामाजिक जोखडामध्ये ती बंदिस्त नाही. ती अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकते. पुरुष-स्त्री समानता मूल्य ती मानते, त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व आजच्या आजीने सिद्ध केले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
