Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
'पैंजण' या कवितेत कवयित्री नीलम माणगावे यांनी चितारलेली आजी व आजच्या युगातील आधुनिक आजी यांच्या कौटुंबिक स्थानांत जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे.
कवितेत वर्णन केलेल्या आजीच्या पायात अवजड पैंजण होते, म्हणजे रूढीपरंपरेच्या भोवऱ्यात ती जखडलेली होती. त्या काळातील समाजव्यवस्था, सामाजिक मूल्ये व कौटुंबिक व्यवस्था यांनी आजीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. स्वयंपाकघर व माजघर हीच तिची हद्द होती. आणि 'चूल व मूल' हा तिचा एकांगी संसार होता. तिला बाहेरच्या अंगणातही डोकावण्याची मुभा नव्हती नि बाहेरचे जग तिला पारखे होते. म्हणून रूढींचा जुलूम निमूटपणे सोसत कवितेतली आजी जीवन जगत होती. तिच्या मनातील भावना व विचार यांच्या प्रकटीकरणाला मज्जाव होता.
आजची आजी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती घरात व घराबाहेर स्वतंत्रपणे वावरू शकते. स्त्री-शक्ती जागृत झाल्यामुळे ती स्वत:चे विचार मुक्तपणे मांडू शकते. सामाजिक कार्य करू शकते. घरातील नातवंडांपासून मोठ्यांपर्यंतचा गोतावळा समर्थपणे पेलू शकते. तिला कुठलाही अटकाव नाही. ती हवा तसा पेहराव व दागदागिने घालू शकते. कुठल्याही कौटुंबिक व सामाजिक जोखडामध्ये ती बंदिस्त नाही. ती अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकते. पुरुष-स्त्री समानता मूल्य ती मानते, त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व आजच्या आजीने सिद्ध केले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
