Advertisements
Advertisements
प्रश्न
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
'पैंजण' या कवितेमध्ये कवयित्री नीलम माणगावे यांनी चार पिढ्यांतील स्त्रीच्या जीवनशैलीमधील अंतर शब्दबद्ध केले आहे. आजी-आई-स्वतः कवयित्री - कवयित्रीची मुलगी यांच्या वागण्यातून स्त्री-स्वातंत्र्याचा आलेख साकारला आहे.
आजीच्या पायांत दोन-दोन किलोंचे पैंजण, या प्रतीकांतून रूढीपरंपरेच्या जोखडात पूर्णपणे जखडलेली आजीच्या पिढीतील स्त्री प्रत्ययाला येते. तर आईने पैंजण नाकारून 'हलक्या नाजूक तोरड्या' स्वीकारल्या, या प्रतीकातून बंधने थोडीशी सैल झाल्याचा संकेत मिळतो. आजीचे विश्व केवळ स्वयंपाकघर व माजघर इथपर्यंतच मर्यादित होते. तिला पडवीतून अंगणात येण्याचीही मुभा नव्हती. 'चूल आणि मूल' हेच तिचे सर्वस्व होते व तिने ते निमूटपणे मान्यही केले होते. आजीला या जोखडांमध्ये पायाला व मनाला जखमा व्हायच्या. कवयित्रींच्या आईला तोरड्यांमुळे जखमा झाल्या नाहीत आणि तिला माजघरापासून अंगणापर्यंत संचार करायला परवानगी होती. जरासे स्वातंत्र्य अनुभवत होती; पण काही बंधनांमुळे मनाला टोचणी लागतच होती. आजीने आपल्या जखमा फडक्यांनी झाकून त्यांना ऊब दिली होती; तर आईने जखमांकडे दुर्लक्ष केले होते. आजीपेक्षा आईची जीवनशैली थोडीशी सुकर झालेली असली, तरी बंधनांची भीती व जाच कायम होता.
अशा प्रकारे, अनेक प्रतीकांतून आजीच्या व आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कवयित्रींनी ओघवत्या शब्द शैलीत दृग्गोचर केला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
