हिंदी

मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या आश्रयाला का आलो, याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दांत मांडले आहे. त्याच वेळी 'साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते,' हा ठोस विचारही मांडला आहे.
कवी म्हणतात- शब्दांनी मला आयुष्यभर सावरले. जगण्याची उमेद दिली. आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कैक वेळा शब्दांच्या कुशीत शिरलो. स्वत:चा बचाव केला. दुःखाचे विष मी प्यायलो, पण ते पचवले शब्दांनी ! मी शब्दांविषयी कृतज्ञ आहे.
'विष मी प्यालो नि शब्दांनी पचविले' या विधानातून कवींची शब्दांबद्दलची कृतार्थता व्यक्त होते. 'शब्द आमुच्या जिवाचे जीवन !' ही संत तुकारामांच्या उक्तीची आठवण व्हावी, असे सामर्थ्य या ओळीत आहे. आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त झाला आहे.

shaalaa.com
पद्य (Poetry) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: शब्द - कृती [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 2.1 शब्द
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्न

चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम  _______


चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा  _______


खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।


खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥


‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.


कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’


सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.


आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.


'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-


खालील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र ध्वनित होणारा अर्थ
माझी आजी    
माझी आई    
मी    
माझी मुलगी    

खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील प्रतीक कवितेचा रचनाप्रकार कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेची भाषाशैली
         

‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.


कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.


पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×