Advertisements
Advertisements
प्रश्न
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
चार पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेतून स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्द शैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. कवयित्रींच्या आजीने दोन-दोन किलोंचे अवजड पैंजण रूढीपरंपरेचे जोखड म्हणून मिरवले. रूढी परंपरा निमूटपणे पाळण्यात तिचे विश्व बंदिस्त झाले. कवयित्रींच्या आईने पैंजण नाकारले; पण तोरड्या स्वीकारल्या. म्हणजे तिच्या मनाला स्त्री-स्वातंत्र्याची चाहूल लागली. पण तिलाही सर्व बंधने शिथिल करता आली नाहीत.
कवयित्रींनी स्वत: पैंजण व तोरड्या दोन्हीही हद्दपार केल्या. अंगण ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल टाकले. मोकळा श्वास घेतला. आधुनिक चपल, बूट, सॅन्डल पायात अडकवले. परंतु तरीही पूर्ण स्त्री स्वातंत्र्य तिला उपभोगता आले नाही. आजी व आईच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तिची जीवनशैली काहीशी मुक्त होती. परंतु कधी कधी चपला घसरल्या, सॅन्डल टोचल्या नि बूट चावले. म्हणजे बंधनाचा थोडा जाच कवयित्रींना सहन करावा लागला. घर सोडून, घराच्या म्हणजेच रूढीच्या जाचक जोखडापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा मिळवली. या मुक्त स्वातंत्र्यासाठीच थोडीशी बंधने कवयित्रींनी स्वीकारली
अतिशय सूचक शब्दांत कवयित्रींनी प्रस्तुत ओळीतून कवयित्रींच्या पिढीची होणारी घुसमट व्यक्त केली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
