English

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।। - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।

Short/Brief Note
Advertisements

Solution

'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे. ।
प्रस्तुत ओवी मध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वत: आस्वादावीशी वाटते, यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. ।
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.

shaalaa.com
पद्य (Poetry) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिकें - कृती [Page 34]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.08 ऐसीं अक्षरें रसिकें
कृती | Q (४) (अ) | Page 34

RELATED QUESTIONS

अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।


अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।


चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम  _______


ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.


कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'


सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड  करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.


मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.


'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.


‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.


‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-


खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.


खालील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र ध्वनित होणारा अर्थ
माझी आजी    
माझी आई    
मी    
माझी मुलगी    

‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा


‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×