Advertisements
Advertisements
Question
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
Advertisements
Solution
'शब्द' या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले, यांचे हृदय शब्दांत वर्णन केले आहे.
ते म्हणतात - शब्दांनी माझ्या जीवनातला आकांत शमवला. माझ्यावर मातेसारखी ममता केली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाडला गेलो, तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते व जीव अस्वस्थ करते. त्या आठवणीच्या आगीत जिवाची लाही लाही होते. त्या आठवणीची धग नकोशी वाटते. अशी एखादी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली, तेव्हा त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वत: झेलला. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच बहाल केले.
'आठवणींची आग' या प्रतिमेतून आठवणीची दाहकता प्रकर्षाने जाणवते. 'हल्ला' या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दु:खाची तीव्रता व शब्दाची शक्ती प्रत्ययकारीरीत्या मांडली आहे
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
