Advertisements
Advertisements
Question
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
Advertisements
Solution
कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेत दुःखाने भरलेल्या आयुष्यात शब्दांची समर्थ साथ आवश्यक असल्याचा ठाम विचार मांडला आहे. संघर्षमय व खडतर आयुष्यात शब्दच धीर देतात व जगण्याची उमेद वाढवतात, असा संदेश त्यांनी दिला आहे.
कवींच्या दुःखद आक्रोशाच्या हाकेला शब्द तत्परतेने धावून आले. कवींच्या बिकट संकटांच्या वेळी शब्दांनी आईच्या ममतेने पोटाशी घेतले. आगपाखड करणारी आठवणीची आग जेव्हा तुटून पडली, तेव्हा शब्दांनी तो हल्ला झेलला. तापदायक प्रसंगात शब्दांनीच त्यांच्यावर सावली धरली. दुःखाचा दाट अंधार भेदण्यासाठी कवींच्या हातात शब्दांनी लखलखीत वीज दिली. खडतर आयुष्याचा तोल शब्दांनीच सावरला. मरणप्राय यातनांच्या प्रवाहातून शब्दांनी किनाऱ्याशी नेले. जेव्हा स्वत:वरचा व जगण्यावरचा कवींचा विश्वास उडाला, तेव्हा शब्दांनी पाठीवर हात ठेवून धीर दिला. निराधार भटकत असताना शब्दांनीच त्यांना आश्रय दिला. कवींच्या आयुष्यातील कठोर प्रसंगांचे विष स्वत: शब्दांनी पचवले.
अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींना शब्दांनीच सावरले. म्हणून शब्द म्हणजेच कवींचे जीवन जगण्याचे सामर्थ्य होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
