Advertisements
Advertisements
Question
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Advertisements
Solution
स्वच्छंदी फुलपाखरू
एकदा काय झाले, एक छोटेसे, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू फुलांच्या ताटव्यावरून उडत होते. या फुलावरून त्या फुलावर! अचानक त्याची नजर वर उंच आभाळाकडे गेली. एक रंगीबेरंगी वस्तू निळ्या आभाळात वाऱ्यासोबत वर वर जात डुलत झुलत होती. जरा नीट पाहिल्यावर त्या फुलपाखराच्या लक्षात आले 'अरे, हा तर पतंग!' त्याला पाहून फुलपाखराच्या मनात आले 'हा पतंग किती भाग्यवान आहे! तो आभाळात उंचच उंच विहार करू शकतो. त्याला स्वत:ला त्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. वाऱ्या च्या सोबतीने तो उंच उडत जातो. वरून खाली पाहताना त्याला किती सुंदर दृश्य दिसत असेल बरे! खालच्या सर्व वस्तू, माणसे, घरे अगदी मुंगीएवढी दिसतील. आकाशातल्या ढगांना त्याला स्पर्श करता येईल. किती मजाच मजा!'
असा विचार करत असतानाच अचानक तो पतंग आभाळात दिसेनासा झाला. तो कुठे झाडाला अडकून फाटला का, की कुठे आणखी उंच ठिकाणी गेला हे पाहण्यासाठी त्या फुलपाखराने नजर इकडेतिकडे भिरभिरवली. पाहतो तर काय, तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निपचित पडला होता. तो पतंग उडवणारी मुले त्याला तिथेच टाकून क्रिकेट खेळायला गेली होती. आता पतंगाला हवेत उडणे तर सोडाच, साधे जागेवरून हलताही येत नव्हते. ते पाहून फुलपाखराच्या मनात आले 'अरे, मग मी तर किती भाग्यवान आहे! मी माझ्या मर्जीने, मुक्तपणे मला हवे तेव्हा हवे तिथे उडू शकतो, भले मला पतंगाइतके उंच उडता येत नसेल; पण मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो!
क्षणा-दोन क्षणांपूर्वी पतंगाचा हेवा करणाऱ्या फुलपाखराला स्वत:च्या आयुष्याची, स्वातंत्र्याची किंमत कळली, तेव्हा त्याने देवाचे मनापासून आभार मानले.
तात्पर्य: दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे.
RELATED QUESTIONS
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
|
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
|
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
|
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.




