Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Advertisements
उत्तर
स्वच्छंदी फुलपाखरू
एकदा काय झाले, एक छोटेसे, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू फुलांच्या ताटव्यावरून उडत होते. या फुलावरून त्या फुलावर! अचानक त्याची नजर वर उंच आभाळाकडे गेली. एक रंगीबेरंगी वस्तू निळ्या आभाळात वाऱ्यासोबत वर वर जात डुलत झुलत होती. जरा नीट पाहिल्यावर त्या फुलपाखराच्या लक्षात आले 'अरे, हा तर पतंग!' त्याला पाहून फुलपाखराच्या मनात आले 'हा पतंग किती भाग्यवान आहे! तो आभाळात उंचच उंच विहार करू शकतो. त्याला स्वत:ला त्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. वाऱ्या च्या सोबतीने तो उंच उडत जातो. वरून खाली पाहताना त्याला किती सुंदर दृश्य दिसत असेल बरे! खालच्या सर्व वस्तू, माणसे, घरे अगदी मुंगीएवढी दिसतील. आकाशातल्या ढगांना त्याला स्पर्श करता येईल. किती मजाच मजा!'
असा विचार करत असतानाच अचानक तो पतंग आभाळात दिसेनासा झाला. तो कुठे झाडाला अडकून फाटला का, की कुठे आणखी उंच ठिकाणी गेला हे पाहण्यासाठी त्या फुलपाखराने नजर इकडेतिकडे भिरभिरवली. पाहतो तर काय, तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निपचित पडला होता. तो पतंग उडवणारी मुले त्याला तिथेच टाकून क्रिकेट खेळायला गेली होती. आता पतंगाला हवेत उडणे तर सोडाच, साधे जागेवरून हलताही येत नव्हते. ते पाहून फुलपाखराच्या मनात आले 'अरे, मग मी तर किती भाग्यवान आहे! मी माझ्या मर्जीने, मुक्तपणे मला हवे तेव्हा हवे तिथे उडू शकतो, भले मला पतंगाइतके उंच उडता येत नसेल; पण मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो!
क्षणा-दोन क्षणांपूर्वी पतंगाचा हेवा करणाऱ्या फुलपाखराला स्वत:च्या आयुष्याची, स्वातंत्र्याची किंमत कळली, तेव्हा त्याने देवाचे मनापासून आभार मानले.
तात्पर्य: दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे.
संबंधित प्रश्न
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
|
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


|
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
|
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.




