मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वच्छंदी फुलपाखरू

एकदा काय झाले, एक छोटेसे, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू फुलांच्या ताटव्यावरून उडत होते. या फुलावरून त्या फुलावर! अचानक त्याची नजर वर उंच आभाळाकडे गेली. एक रंगीबेरंगी वस्तू निळ्या आभाळात वाऱ्यासोबत वर वर जात डुलत झुलत होती. जरा नीट पाहिल्यावर त्या फुलपाखराच्या लक्षात आले 'अरे, हा तर पतंग!' त्याला पाहून फुलपाखराच्या मनात आले 'हा पतंग किती भाग्यवान आहे! तो आभाळात उंचच उंच विहार करू शकतो. त्याला स्वत:ला त्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. वाऱ्या च्या सोबतीने तो उंच उडत जातो. वरून खाली पाहताना त्याला किती सुंदर दृश्य दिसत असेल बरे! खालच्या सर्व वस्तू, माणसे, घरे अगदी मुंगीएवढी दिसतील. आकाशातल्या ढगांना त्याला स्पर्श करता येईल. किती मजाच मजा!'

असा विचार करत असतानाच अचानक तो पतंग आभाळात दिसेनासा झाला. तो कुठे झाडाला अडकून फाटला का, की कुठे आणखी उंच ठिकाणी गेला हे पाहण्यासाठी त्या फुलपाखराने नजर इकडेतिकडे भिरभिरवली. पाहतो तर काय, तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निपचित पडला होता. तो पतंग उडवणारी मुले त्याला तिथेच टाकून क्रिकेट खेळायला गेली होती. आता पतंगाला हवेत उडणे तर सोडाच, साधे जागेवरून हलताही येत नव्हते. ते पाहून फुलपाखराच्या मनात आले 'अरे, मग मी तर किती भाग्यवान आहे! मी माझ्या मर्जीने, मुक्तपणे मला हवे तेव्हा हवे तिथे उडू शकतो, भले मला पतंगाइतके उंच उडता येत नसेल; पण मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो!

क्षणा-दोन क्षणांपूर्वी पतंगाचा हेवा करणाऱ्या फुलपाखराला स्वत:च्या आयुष्याची, स्वातंत्र्याची किंमत कळली, तेव्हा त्याने देवाचे मनापासून आभार मानले.

तात्पर्य: दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे.

shaalaa.com
लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q १२. (३) | पृष्ठ २५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q १४. | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्‍न

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.


नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.


              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.


‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×