Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Advertisements
उत्तर
स्वच्छंदी फुलपाखरू
एकदा काय झाले, एक छोटेसे, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू फुलांच्या ताटव्यावरून उडत होते. या फुलावरून त्या फुलावर! अचानक त्याची नजर वर उंच आभाळाकडे गेली. एक रंगीबेरंगी वस्तू निळ्या आभाळात वाऱ्यासोबत वर वर जात डुलत झुलत होती. जरा नीट पाहिल्यावर त्या फुलपाखराच्या लक्षात आले 'अरे, हा तर पतंग!' त्याला पाहून फुलपाखराच्या मनात आले 'हा पतंग किती भाग्यवान आहे! तो आभाळात उंचच उंच विहार करू शकतो. त्याला स्वत:ला त्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. वाऱ्या च्या सोबतीने तो उंच उडत जातो. वरून खाली पाहताना त्याला किती सुंदर दृश्य दिसत असेल बरे! खालच्या सर्व वस्तू, माणसे, घरे अगदी मुंगीएवढी दिसतील. आकाशातल्या ढगांना त्याला स्पर्श करता येईल. किती मजाच मजा!'
असा विचार करत असतानाच अचानक तो पतंग आभाळात दिसेनासा झाला. तो कुठे झाडाला अडकून फाटला का, की कुठे आणखी उंच ठिकाणी गेला हे पाहण्यासाठी त्या फुलपाखराने नजर इकडेतिकडे भिरभिरवली. पाहतो तर काय, तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निपचित पडला होता. तो पतंग उडवणारी मुले त्याला तिथेच टाकून क्रिकेट खेळायला गेली होती. आता पतंगाला हवेत उडणे तर सोडाच, साधे जागेवरून हलताही येत नव्हते. ते पाहून फुलपाखराच्या मनात आले 'अरे, मग मी तर किती भाग्यवान आहे! मी माझ्या मर्जीने, मुक्तपणे मला हवे तेव्हा हवे तिथे उडू शकतो, भले मला पतंगाइतके उंच उडता येत नसेल; पण मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो!
क्षणा-दोन क्षणांपूर्वी पतंगाचा हेवा करणाऱ्या फुलपाखराला स्वत:च्या आयुष्याची, स्वातंत्र्याची किंमत कळली, तेव्हा त्याने देवाचे मनापासून आभार मानले.
तात्पर्य: दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे.
संबंधित प्रश्न
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.




