English

HSC Arts (English Medium) 12th Standard Board Exam - Maharashtra State Board Question Bank Solutions

Advertisements
[object Object]
[object Object]
Subjects
Popular subjects
Topics

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  5921 to 5940 of 9693  next > 

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा:

(१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय: (२)

(य) ______

(र) ______

(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा - (२)

(य) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ______.

(अ) जीवनसत्त्व देऊन
(आ) सत्त्वगुणांना आश्रय घेऊन
(इ) सात्त्विक आहार देऊन
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून

(र) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे - ______

(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारुडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारुड अधिक रंजक बनते.

विंचू चावला वृश्चिक चावला।
कामक्रोध विंचू चावला।
तम घाम अंगासी आला ॥धृ.॥

पंचप्राण व्याकुळ झाला।
त्याने माझा प्राण चालिला।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची ॥२॥

ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां ॥3॥

सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ॥४॥

(३) अभिव्यक्ति: (४)

सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

[2.07] विंचू चावला... (भारूड)
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: undefined >> undefined

खालील ओळींचा अर्थ लिहा:

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

[1.02] रोज मातीत (कविता)
Chapter: [1.02] रोज मातीत (कविता)
Concept: undefined >> undefined

Advertisements

रसग्रहण:

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

वरील ओळींचे रसग्रहण करा.

[1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: undefined >> undefined

सूचनेप्रमाणे सोडवा:

जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)

[5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Concept: undefined >> undefined

‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.

[6] अतिरिक्त व्याकरण
Chapter: [6] अतिरिक्त व्याकरण
Concept: undefined >> undefined

‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

[6] अतिरिक्त व्याकरण
Chapter: [6] अतिरिक्त व्याकरण
Concept: undefined >> undefined

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)

(य) कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. (१)

(र) कथानकाचे प्रयोजन लिहा. (१)

           कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते; म्हणून कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच ‘कथाबीज’ असे म्हणतात.

           कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.

           पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते.

(२) कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. (२)

[3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Chapter: [3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Concept: undefined >> undefined

‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

[3.01] शोध
Chapter: [3.01] शोध
Concept: undefined >> undefined

‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.

[3.02] गढी
Chapter: [3.02] गढी
Concept: undefined >> undefined

माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

[4.02] माहितीपत्रक
Chapter: [4.02] माहितीपत्रक
Concept: undefined >> undefined

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.

[4.02] माहितीपत्रक
Chapter: [4.02] माहितीपत्रक
Concept: undefined >> undefined

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा:

अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.

[4.03] अहवाल
Chapter: [4.03] अहवाल
Concept: undefined >> undefined

पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

नाट्यमयता/संघर्ष: कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो.
संवाद: कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.
भाषाशैली:

कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते.

वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगांतून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळेसौंदर्य प्राप्त होते.

कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते.

(१) (2)

(i) 

(ii)

(२) कथेतील ‘नाटयात्मता’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्पष्ट करा. (2)

[3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Chapter: [3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Concept: undefined >> undefined

‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.

[3.02] गढी
Chapter: [3.02] गढी
Concept: undefined >> undefined

माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.

[4.02] माहितीपत्रक
Chapter: [4.02] माहितीपत्रक
Concept: undefined >> undefined
< prev  5921 to 5940 of 9693  next > 
Advertisements
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×