English

‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

"गढी" हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक होते. गढीचा गावावर प्रभाव होता आणि गावाला तिचा आधारही मिळायचा. मात्र, स्वातंत्र्यानंतर गढीने आपले सत्तास्थान गमावले, तरीही ती गावासाठी एक आधारस्तंभ होती. काळाच्या ओघात, उन्हापावसाशी झुंज देत गढी टिकून राहिली, पण हळूहळू ती खंगत जाऊ लागली. चारही बाजूंनी तिचे कणाकणाने विघटन होत होते. काही संधीसाधू लोक गढीच्या पतनाची वाट पाहत होते.

गावकऱ्यांनाही गढीच्या कोसळण्याची फारशी खंत नव्हती, कारण गढीखालची सुपीक पांढरी माती त्यांना हवी होती. ते हळूहळू जमिन उकरत होते. गावाचा विकास योग्य दिशेने चालू असताना, काही लोकांच्या कृत्यांमुळे त्याला विपरीत वळण लागले. गढी जशी कोसळली, तसाच गावाचाही ऱ्हास झाला. याच नशिबाला बापू गुरुजीही सामोरे गेले. "गढी" ही कथा गावाच्या स्थित्यंतराचे आणि पतनाचे प्रतीकात्मक चित्रण करते. गावाचा ऱ्हास, गढीचे पतन आणि बापू गुरुजींची पडझड या तिन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच "गढी" हे शीर्षक या कथेच्या आशयाला पूर्णतः न्याय देते.

shaalaa.com
गढी
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

चौकटी पूर्ण करा.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - ____________


चौकटी पूर्ण करा.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - ____________


चौकटी पूर्ण करा.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - ____________


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि परबतराव


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि संपती


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
लक्ष्मी आणि बापू गुरुजी


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि पाटील


कृती करा.
गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी


कृती करा.
बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये


कारणे लिहा.
गावतला जो तो आनंदात होता; कारण


कारणे लिहा.
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण


कारणे लिहा.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण


थोडक्यात उत्तरे लिहा.
'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.


स्वमत:

बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.


गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत:
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.


'गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.


‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.


‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.


बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.


गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.


बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×