English

गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Questions

गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.

‘गढी’ या कथेतील गावातल्या उचापती करणार्‍या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.

Explain
Long Answer
Advertisements

Solution

उचापती करणारे लोक सर्वत्र असतात, असे आता माझे मत झालेले आहे. ‘गढी’ या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे. शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरांतसुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामांत अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला, तर त्यांची किंमत नाहीशी होईल, अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की, उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वत:चा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते. फुकटात पैसा लुटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे. तरच आपला देश सुधारेल.

shaalaa.com
गढी
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.02: गढी - कृती (६) [Page 84]

RELATED QUESTIONS

चौकटी पूर्ण करा.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - ____________


चौकटी पूर्ण करा.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - ____________


चौकटी पूर्ण करा.
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - ____________


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि परबतराव


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि संपती


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
लक्ष्मी आणि बापू गुरुजी


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि पाटील


कृती करा.
गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी


कृती करा.
बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये


कारणे लिहा.
गावतला जो तो आनंदात होता; कारण


कारणे लिहा.
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण


थोडक्यात उत्तरे लिहा.
'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.


स्वमत:
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.


'गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.


‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.


‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.


‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.


‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.


बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.


गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.


बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×