Advertisements
Advertisements
Questions
‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.
‘गढी’ या शीर्षकाची समर्पकता पटवून दया.
Advertisements
Solution
‘गढी’ हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गढीच्या गावावर प्रभाव असायचा. त्याचबरोबर गावाला गढीचा आधारही असायचा, ती गढी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली. तरीही तिचा आधार होता. उन्हापावसाला तोंड देत, त्यांच्याशी झगडत गढी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गढी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गढी कोसळली तर हवीच होती. गढीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होतेच, गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते. पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गढीचे झाले तेच गावाचे झाले. गढी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली, तशी गढीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव, बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गढी होय. म्हणून ‘गढी’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चौकटी पूर्ण करा.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - ____________
चौकटी पूर्ण करा.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - ____________
चौकटी पूर्ण करा.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - ____________
चौकटी पूर्ण करा.
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - ____________
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि परबतराव
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
लक्ष्मी आणि बापू गुरुजी
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि पाटील
कृती करा.
गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी
कृती करा.
बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये
कारणे लिहा.
गावतला जो तो आनंदात होता; कारण
कारणे लिहा.
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण
कारणे लिहा.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण
थोडक्यात उत्तरे लिहा.
'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.
स्वमत:
बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत:
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
'गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.
बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.
बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा.
