English

टिपा लिहा. रेखाजींच्या कार्याचा परिणाम

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम

Short/Brief Note
Advertisements

Solution

'वीरांगना' या पाठात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे.
घरातील भांडणामुळे, मुंबईच्या आकर्षणामुळे घर सोडणे, समाजकंटकांकडून अपहरण होणे या व अशा अनेक कारणांमुळे भरकटलेल्या मुलांना सुखरूप घरी पोहोचवण्याचे, त्यांना सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. त्यांच्या या कामाचा परिणाम म्हणजे अनेक भरकटलेल्या मुलांना त्यांचे घर मिळाले. कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊ लागली. नाचूबागडू लागली. जीवनाचा आनंद घेऊ लागली. कुठल्याही वाईट प्रवृत्तींना बळी न पडता ही मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकली. अशाप्रकारे, या मुलांचे भवितव्य बिघडण्यापासून वाचले. त्यांच्या आयुष्याला योग्य वळण मिळाले. कोवळ्या वयातील मुलांच्या आयुष्यावर इतका सकारात्मक परिणाम घडवून आणणारे रेखाजींचे हे कार्य राष्ट्रघडणीसाठीही मोलाचे आहे असे म्हणता येईल.

shaalaa.com
वीरांगना
  Is there an error in this question or solution?
Chapter 15.2: वीरांगना - कृती क्रमांक ३

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 15.2 वीरांगना
कृती क्रमांक ३ | Q २) ब)

RELATED QUESTIONS

टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.


मुद्‌द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


खालील आकृती पूर्ण करा.


'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×