English

टिपा लिहा. मुले भरकटण्याची कारणे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे

Short/Brief Note
Advertisements

Solution

'वीरांगना' या पाठात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा परिचय दिला आहे. मुंबई महानगरीत आलेल्या भरकटलेल्या, हरवलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देण्याचे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्या करतात. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून घर सोडून येणे, मुंबई शहराचे व खास करून बॉलिवूडचे आकर्षण असल्यामुळे मुंबईत दाखल होणे, घरच्या गरिबीमुळे त्रासून कामाच्या शोधात मुंबईला येणे, शहरातील पत्ता माहीत नसताना मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला येऊन रस्ता चुकणे, समाजकंटकांकडून बेकायदेशीर कामासाठी अपहरण होणे, फेसबुकवरील गप्पांतून अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधासाठी येणे अशा अनेकविविध कारणांमुळे ही मुले भरकटतात. त्यांना सन्मार्गावर आणून वाईट प्रवृत्तींपासून त्यांचे रक्षण करण्याचे फार महत्त्वाचे व अनोखे कार्य सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत.

shaalaa.com
वीरांगना
  Is there an error in this question or solution?
Chapter 15.2: वीरांगना - कृती क्रमांक ३

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 15.2 वीरांगना
कृती क्रमांक ३ | Q २) अ)

RELATED QUESTIONS

खालील आकृती पूर्ण करा.


‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.


भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×