Advertisements
Advertisements
Question
'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
'वीरांगना' या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक व थक्क करणारा जीवनप्रवास मांडला आहे.
आपल्या वीरपतीच्या निधनानंतर वयाच्या चाळिसाव्या वर्षी भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. 'स्टेट सिलेक्शन बोर्डाची' परीक्षा त्या पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. शारीरिक व वैद्यकीय चाचण्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. अकरा महिन्यांचा खडतर प्रशिक्षण कालावधी तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने पार पाडला. या त्यांच्या सर्व जीवनप्रवासात त्यांनी केलेले कठोर परिश्रम दिसून येतात. समाजाने शिक्षण, तसेच राजकीय क्षेत्रात देऊ केलेल्या मानाच्या संधी, आमिषे त्यांनी नाकारली. सैन्यात भरती होण्याचा, पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा देशसेवेचा निर्धार त्यांनी आपल्या निग्रही, करारी व धाडसी वृत्तीने पूर्ण केला.
पदरी दोन मुले असतानाही लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल होऊन अभिमानास्पद दोन पदके त्यांनी मिळवली. हा त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास त्यांच्या परिश्रमांचेच फळ आहे. यावरूनच जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम यांच्या बळावरच स्वाती यांनी देशसेवेचा आपला निर्धार पूर्ण करता आला, असे म्हणता येते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
खालील आकृती पूर्ण करा.

‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
