English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

माझा आवडता खेळ

खेळ म्हणजे माझा जीव की प्राण! अगदी गोट्या, कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने दूरदर्शनवर पाहायला मला खूप आवडते; परंतु, माझा सर्वांत आवडता खेळ म्हणजे ‘कबड्डी’. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, त्यामुळे तो रांगडा खेळ आहे. ‘हुतूतू’ या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनसामग्रीची गरज नसते. आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला तो खूप आवडतो. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे, पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला जिंकवून देणे यातील आनंद अवर्णनीय आहे.

कबड्डीचे मैदान दोन भागांत विभागलेले असते. त्याला कोर्ट म्हणतात. दोन्ही कोर्टच्या मध्यावर एक रेषा असते. या मध्यरेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये एक टचलाइन असते. टचलाइनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनसलाइन असते. दोन संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. सात खेळाडू मुख्य, तर चार राखीव खेळाडू असतात. मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक म्हणून खेळायला फार आवडते. खेळाडू मैदानात उतरले, की नाणेफेक जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवतो. या खेळाडूने सतत ‘कबड्डी कबड्डी’ म्हणायचे असते. जर त्याने हे थांबवले, तर तो ‘बाद’ म्हणून घोषित होतो. प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात. ते आपापल्या युक्त्या, पेच-डावपेच वापरून खेळ खेळत राहतात.

हा खेळ साधारणत: २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो; हा खेळ मुख्यत: मातीत खेळला जातो; परंतु सध्या इनडोअर स्टेडिअममध्ये मॅटवर हा खेळ खेळला जात आहे. दोन्हींकरता शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे. श्वासाचे तंत्र, चढाईचे व पकडीचे कौशल्य, चपळाई, शारीरिक सक्षमता, ही या खेळासाठीची आवश्यक कौशल्ये आहेत. ही कौशल्ये वाढवण्यासाठी नियमित सराव करणे, प्रशिक्षण घेणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे.

सध्याच्या प्रो-कबड्डी लीगमधील अनुपकुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. ‘कबड्डी’ हा खेळ आता केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा आपल्या मातीतला रांगडा खेळ मला फार आवडतो.

shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: नातवंडांस पत्र - लिहिते होऊया [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 नातवंडांस पत्र
लिहिते होऊया | Q १. | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 नातवंडांस पत्र
लिहिते होऊया | Q १. | Page 41

RELATED QUESTIONS

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो.

असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.


रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.


खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.


खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.

एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे.

एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×