English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

उत्तरा देशपांडे
१०२, शांतीकुंज,
सोमवार पेठ,
पुणे - ४११००२.
दि. ३०. एप्रिल, २०१७

प्रिय सई,
सप्रेम नमस्कार,

     परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या. ह्यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे, आम्हां सर्वांना महाबळेश्वरला नेले. मी, आई, बाबा आणि राघव आम्ही सगळेच २२ तारखेला निघालो.

     सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागतो. तुला माहीत आहे? महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती.

      महाबळेश्वरमध्ये निसर्गसाैंदर्य अफाट आहे. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट, वेण्णा तलाव, काटे पॉईंट, एलिफंट पॉईंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वांत उंच पॉईंटवरून महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे.

      भारताच्या स्ट्राबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्राबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते. त्यामुळे, साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्राबेरीवर यथेच्छ ताव मारला. महाबळेश्वरमधील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळाचा मध तसेच, गुलकंद प्रसिद्ध आहे. अशा आल्हाददायक वातावरणात, ऊन्हाच्या झळांपासून दूर चार दिवस कसे गेले कळलेच नाही!

     तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते. पुढची सहल आपण नक्की एकत्र करू. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? इकडे सगळे मजेत आहेत. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. तुझ्या पत्राची वाट बघत आहे.

                                                                                                     तुझी मैत्रीण,
                                                                                                          उत्तरा

shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.1: दादास पत्र - उपक्रम [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | Page 16
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | Page 35
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | Page 35

RELATED QUESTIONS

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो.

असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.


रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.


खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.


‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.


खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.

एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे.

एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.


मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.


अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.


खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.

सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.


तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.


तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×