Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Advertisements
उत्तर
माझा आवडता खेळ
खेळ म्हणजे माझा जीव की प्राण! अगदी गोट्या, कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने दूरदर्शनवर पाहायला मला खूप आवडते; परंतु, माझा सर्वांत आवडता खेळ म्हणजे ‘कबड्डी’. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, त्यामुळे तो रांगडा खेळ आहे. ‘हुतूतू’ या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनसामग्रीची गरज नसते. आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला तो खूप आवडतो. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे, पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला जिंकवून देणे यातील आनंद अवर्णनीय आहे.
कबड्डीचे मैदान दोन भागांत विभागलेले असते. त्याला कोर्ट म्हणतात. दोन्ही कोर्टच्या मध्यावर एक रेषा असते. या मध्यरेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये एक टचलाइन असते. टचलाइनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनसलाइन असते. दोन संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. सात खेळाडू मुख्य, तर चार राखीव खेळाडू असतात. मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक म्हणून खेळायला फार आवडते. खेळाडू मैदानात उतरले, की नाणेफेक जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवतो. या खेळाडूने सतत ‘कबड्डी कबड्डी’ म्हणायचे असते. जर त्याने हे थांबवले, तर तो ‘बाद’ म्हणून घोषित होतो. प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात. ते आपापल्या युक्त्या, पेच-डावपेच वापरून खेळ खेळत राहतात.
हा खेळ साधारणत: २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो; हा खेळ मुख्यत: मातीत खेळला जातो; परंतु सध्या इनडोअर स्टेडिअममध्ये मॅटवर हा खेळ खेळला जात आहे. दोन्हींकरता शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे. श्वासाचे तंत्र, चढाईचे व पकडीचे कौशल्य, चपळाई, शारीरिक सक्षमता, ही या खेळासाठीची आवश्यक कौशल्ये आहेत. ही कौशल्ये वाढवण्यासाठी नियमित सराव करणे, प्रशिक्षण घेणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे.
सध्याच्या प्रो-कबड्डी लीगमधील अनुपकुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. ‘कबड्डी’ हा खेळ आता केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा आपल्या मातीतला रांगडा खेळ मला फार आवडतो.
संबंधित प्रश्न
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
|
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.
