English

‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

स्वमत

‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे.

अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते. अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते.

माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे. ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

shaalaa.com
वेगवशता
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: वेगवशता - कृती [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1.01 वेगवशता
कृती | Q (५). (इ) | Page 6

RELATED QUESTIONS

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

जीवन विभागणारे घटक - ______


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

विचारांची गती म्हणजे- ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अधोगती म्हणजे - ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अक्षम्य आवेग म्हणजे - ______


कृती करा.

गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे - 


कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा


कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे


कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर


कारणे शोधा व लिहा.

अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ______


कारणे शोधा व लिहा.

लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.


योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.


निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.


वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

अमेरिका भारत
   
   
   

खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.


खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.


खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.


स्वमत -

‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत

‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.


स्वमत:

‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.


अभिव्यक्त

रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.


अभिव्यक्त

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेली आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात.

अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्‍चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्यातरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो.

(१) चौकटी पूर्ण करा -    (२)

(य) विचारांची गती म्हणजे - ______

(र) दिशाविहीन गती म्हणजे - ______

(२) कारणे लिहा -      (२)

माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, कारण ______

(य) ______

(र) ______

(३) स्वमत अभिव्यक्ती -
'यथा प्रमाण गती ही गरज आहे' - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.      (४)
                                       किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×