English

अभिव्यक्त रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

अभिव्यक्त

रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुंदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वत:ची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.
अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वत: पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

shaalaa.com
वेगवशता
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: वेगवशता - कृती [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1.01 वेगवशता
कृती | Q (६). (अ) | Page 6

RELATED QUESTIONS

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

जीवन विभागणारे घटक - ______


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

विचारांची गती म्हणजे- ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अधोगती म्हणजे - ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अक्षम्य आवेग म्हणजे - ______


कृती करा.

गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे - 


कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा


कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर


कारणे शोधा व लिहा.

अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ______


कारणे शोधा व लिहा.

लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.


योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.


निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.


वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

अमेरिका भारत
   
   
   

खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.


खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.


स्वमत -

‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत

‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.


स्वमत

‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्वमत:

‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.


अभिव्यक्त

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेली आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात.

अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्‍चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्यातरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो.

(१) चौकटी पूर्ण करा -    (२)

(य) विचारांची गती म्हणजे - ______

(र) दिशाविहीन गती म्हणजे - ______

(२) कारणे लिहा -      (२)

माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, कारण ______

(य) ______

(र) ______

(३) स्वमत अभिव्यक्ती -
'यथा प्रमाण गती ही गरज आहे' - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.      (४)
                                       किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×