Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
Advertisements
Solution
कृष्णराव हेरंबकर हे बाळ गोविंद नाटक मंडळीतले जुन्या जमान्यातील ज्येष्ठ गायक-नट होते. त्यांचे मूळ नाव विठू होते. त्यांनी गडकरी, खाडिलकर, देवल यांच्या नाटकांतील भूमिका पाठवल्या. सौभद्र या संगीत नाटकातील त्यांची कृष्णाची भूमिका फार गाजली. ती पाहून गोपाळ गणेश आगरकरांनी त्यांना 'कृष्णराव' हे नाव बहाल केले व 'सुधारक' या त्यांच्या दैनिकात कृष्णरावांवर अग्रलेख लिहिला. तेव्हापासून 'कृष्णराव' नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलासेवेबद्दल सरकारतर्फे त्यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार होता. या सत्काराला येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. अंबुडीवरून कुंदनपूर, तेथून पुणे व पुण्याहून मुंबई ही दगदग त्यांनी मोठ्या उत्साहाने सोसली. ते इतके हुरळून गेले होते की, प्रसंगी कोंबड्यांच्या गाडीतूनही मुंबईत आले. ते मिश्किल स्वभावाचे, वयपरत्वे चाचरत बोलणारे. कृष्णराव हे अतिउत्साही व धांदरट होते. चाहत्याने लोटांगण घालताच ते चाहत्याचा आग्रह मोडू शकले नाहीत. चाहत्याच्या प्रेमाचे ते भुकेले होते आणि रसिकांनी आग्रह करताच आढेवेढे न घेता त्यांनी सौभद्र मधील 'प्रिये पहा..' हे पद थरथरत्या आवाजात गाऊन दाखवले. कलाकाराचा खरा उत्साह त्यांनी वृद्धापकाळातही टिकवला होता.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
| कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
| ↓ |
| _____________ |
| ↓ |
| ____________ |
| ↓ |
| पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
| ↓ |
| ____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
खालील कृती करा.

स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
| पात | प्रतिक्रिया |
| राजेंद्र | |
| बेबी |
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
स्वमत.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.
