Advertisements
Advertisements
Question
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
Advertisements
Solution
पाराची वाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्याभागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले. गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठांत पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
