English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

आत्मकथन- खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

आत्मकथन-

खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.

♦ वाहने हळू चालवा.
♦ पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
♦ गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा.
♦ गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
♦ वाहन चालवतांना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
♦ लक्षात ठेवा - ‘नाही पेक्षा उशीर बरा’.

Answer in Brief
Advertisements

Solution

मी महामार्गावरील सूचनाफलक बोलतो आहे...

’हे समस्त मानवप्राण्यांनो, आमची निर्मिती तुम्हांला संकटातून वाचवण्यासाठी झाली आहे; पण हे सांगण्याची पाळी आमच्यावरच यावी यासारखी दु:खाची बाब नाही. आम्हांला रंगरंगोटी करून रस्त्यांवर लावले जाते ते केवळ शोभेसाठी नव्हे. त्यावर लिहिलेला संदेश वाचा. त्यानुसार आचरण करा तरच तुम्ही व इतर लोकही सुरक्षित राहतील.

बाबांनो, वाहने चालवताना ती हळू चालवा. 'अति घाई संकटात नेई' म्हणतात ते उगाच नाही. वेळेपेक्षा दहा मिनिटे लवकर निघा रे. घाटात मी उभा असतो 'पुढे एक किलोमीटरचा घाट आहे' या सूचनेसह. तरीही अपघात घडतात. सुरक्षित प्रवास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, म्हणून 'गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा', 'गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा' या आणि अशा अनेक सूचनांचे पालन करा. त्या तुमचे प्राण वाचवतील याची खात्री मी देतो.

आजकाल तर तुमच्या मोबाईलने (भ्रमणध्वनीने) कित्येकांचे जीव घेतले असतील. जर भ्रमणध्वनीवर बोलायचेच असेल, तर गाडी बाजूला थांबवून बोला. अन्यथा गाडी चालवताना भ्रमणध्वनी बंद करून ठेवा. त्याने तुमचे व समोरच्याचेही प्राण वाचतात. लक्षात ठेवा, 'नाही पेक्षा उशीर बरा!' त्यामुळे या सूचना वेळोवेळी पाळा व अपघात कायमचे टाळा.

बाळांनो, माझ्याकडे हात-पाय असते ना, तर येणाऱ्या या संकटांपासून मीच तुम्हांला वाचवले असते; पण माझ्याकडे फक्त तुम्हांला एका जागी उभे राहून सूचना देण्यापलीकडे काही नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यांकडे डोळेझाक करू नका म्हणजे निरपराधांचे व स्वत:चे प्राण वाचतील आणि माझ्याही अस्तित्वाला अर्थ मिळेल. चला, काळजी घ्या.“

shaalaa.com
उपयोजित लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 16.3: उपयोजित लेखन - लेखनकौशल्य [Page 77]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
लेखनकौशल्य | Q २. | Page 77

RELATED QUESTIONS

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

महात्मा फुले विद्यालय बुलढाणा
आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी
एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड
इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्व-परिचयपत्र
मागविण्यात येत आहे.

नाट्यविभाग प्रमुख

अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

 

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव          

(२) पत्ता                 

(३) संपर्क क्रमांक    

(४) जन्मतारीख        

(५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण

(६) छंद

(७) अनुभव/पारितोषिक

(८) इतर कलांमधील प्रावीण्


कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.


घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.

(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.

‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’


दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त
‘आनंदनिकेतन’ या वृक्षवाटिकेतर्फे

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे.

टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात.


¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤

२ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले.

इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.


कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 


गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.

शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस


खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×