Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
Give Reasons
Advertisements
Solution
- भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात समृद्ध नैसर्गिकसंपत्ती आढळते.
- या प्रदेशात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारखी अनेक महत्त्वाची फळे पिकतात.
- फळे ही नाशवंत असल्यामुळे त्यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून उत्पादन मिळवणे आवश्यक असते.
- कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुबलक प्रमाणावर आंबा, काजू, फणस, कोकम या फळांचे उत्पादन होते आणि या उद्योगातून आंबा पेये, डबाबंद आंबारस, आटवलेला आंब्याचा रस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, फणसाचे तळलेले गरे, काजुगर, कोकम सरबत, आमसुले अशी विविध उत्पादने मिळवली जातात.
- या प्रदेशांचा मुंबई, पुणे इत्यादी शहरांशीही संपर्क (जोडणी) असल्यामुळे, त्यांना बाजारपेठेची सुविधाही सहज उपलब्ध होते.
त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
साखळी पूर्ण करा.
| 'अ' | 'ब' | 'क' |
| लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनवणे |
| कुटीरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोह-पोलाद उदयोग |
| ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
| खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
सार्वजनिक उद्योग.
अनुमापी अनुकूलता.
फरक स्पष्ट करा.
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
फरक स्पष्ट करा.
अवजड उदयोग आणि हलके उद्योग.
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -
