English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Questions

तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.

‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.

तुम्हांला समजलेली सूर्याची भूमिका ‘जाता अस्ताला’ या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे, आणि हीच कविता ‘जाता अस्ताला’ म्हणून ओळखली जाते. या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखाद्या घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळयांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.

shaalaa.com
जाता अस्ताला
  Is there an error in this question or solution?
Chapter 8.2: जाता अस्ताला - स्वाध्याय

RELATED QUESTIONS

तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.


पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.


सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावनांचे वर्णन शब्दबद्ध करा.


‘जाता अस्ताला’ कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.


सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.

 


सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.


सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.


कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.


प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×